भंडारा जिल्ह्यात T-27 वाघिणीचा थरार !सलग हल्ल्यांनंतर वनविभागाची युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू

भंडारा : वन विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालय, भंडारा अंतर्गत येणाऱ्या कक्ष क्रमांक १४३ मध्ये दिनांक १९ मार्च २०२६ रोजी T-27 या वाघिणीने हल्ला करून श्री.वसंत मेश्राम यांना ठार केले होते. त्यानंतर दिनांक २८ मार्च २०२६ रोजी श्रीमती माया सोनवाणे यांच्यावर वाघिणीने हल्ला केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती , उपचारादरम्यान त्या मृत्यू पावल्या.

तसेच दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी वाघिणीने पुन्हा श्रीमती छाया मुंगमोडे  यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले असून सध्या त्यांच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे..

मानव-वन्यजीव संघर्षाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता वनविभागाने या घटनेची तात्काळ दखल घेतली असून संबंधित हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

सदर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे वन्यजीव बचाव पथक, गोंदिया वन विभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तसेच भंडारा वन विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे.

वाघिणीच्या वावराच्या ठिकाणी तसेच संभाव्य प्रवेश मार्गांवर व वावर क्षेत्रात मचान व आमिष (बेट) तयार करण्यात आले असून वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी आवश्यक साधनसामग्रीसह चार प्रशिक्षित शार्प शूटर तैनात करण्यात आले आहेत.

तसेच वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ५० हून अधिक कॅमेरा ट्रॅप व १० लाईव्ह कॅमेऱ्यांद्वारे सतत देखरेख ठेवण्यात येत आहे. याशिवाय, चार थर्मल ड्रोनच्या सहाय्याने जंगल परिसरात दिवस-रात्र शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

वाघिणीचे दररोज चे असित्व/वावर क्षेत्राची माहिती ची वनविभागास मिळत असून वन विभागामार्फत वाघिणीला जेरबंद करण्याचे प्रयत्न अधिक तीव्र करण्यात आले असून लवकरच संबंधित वाघिणीला जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास नवेगाव-नागझिरा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने व्यक्त केला असून स्थानिक नागरिकांनी वनविभागास सदर वाघिणीचे जेरबंद करण्याच्या अनुषंगाने प्रशासनास सहकार्य करावे, असे जाहीर आव्हान करण्यात येत आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें